रामचंद्र मुंदाने, अमरावती प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तिवसा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरखेड फाट्यावर व अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या जनावरांच्या ट्रकला पोलिसांनी पकडून 35 जनावरांची सुटका केली. तर दोन जनावरांचा मात्र गुदमरुन मृत्यू झाला असून पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
15 जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाने एम .पी. 04 एच. ई.1693 या मालवाहु झेनाॅन कंपनिच्या ट्रकमध्ये जनावरांना निर्दयतेने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने अमरावतीकडे येत असताना. तिवसा पोलिसांनी वरखेड फाट्यावर सापळा रचुन या ट्रकला पकडून ताब्यात घेतले . या ट्रकमधील एकुण 37 जनावरांपैकी 35 जनावरांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले, तर दोन जनावरांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता.
या प्रकरणी तिवसा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनात एपिआय मडफे , खंडारे , वाहतुक शिपाई प्रवीण चव्हाण, विशाल सूर्यवंशी , यांनी कारवाई करुन पुढिल तपास सुरु आहे .