राहुल गांधी विरोधात मानहानीची तक्रार

0

पटना: ‘सारे मोदी चोर हैं’ या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात बिहारमधील भाजपाचे वरिष्ठ नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अशा प्रकारचे वक्तव्य करुन मोदी टायटल असलेल्या व्यक्तींना चोर म्हटले आहे. यामुळे समाजात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे. तसेच, हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य असून याची शिक्षा कोर्टामार्फत राहुल गांधी यांना झाली पाहिजे, असेही सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.