राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अनेकांनी केला पक्षात प्रवेश

0

जळगाव – देशभरामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर करणार्‍याची रिघही सुरू असून यात आज जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माजी उपमाहापौर गणेश सोनवणे, संंत्यजीत नेमाने, नंदू भापसे, अण्णा भापसे, नगराध्यक्ष चंत्रभूज सोनवणे आदींनी प्रवेश केला.

दरम्यान, पक्ष संघटना आपली पूर्ण ताकदीने वाढली पाहिजे. तुमचा बूथ वार्ड दुरुस्त करा. याची फार मोठी मदत आपल्याला होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते. आघाडीचे मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा या उद्देशाने बहुजन वंचित आघाडी लोकसभेची निवडणूक लढवीत आहे, मात्र जनता ही खूप सूज्ञ आहे, बहूजन वंचित आघाडीचा हा उद्देश ते सफल होऊ देणार नाही, असाही विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्व पदाधिकार्‍यांनी बूथ कमिट्या बांधून करतात कराव्यात, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, जळगाव लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, आ.सतीष पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खा.ईश्‍वरबाबु जैन, माजी आ.दिलीप वाघ, राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, अरुण पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक, डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड ललिता पाटील, कल्पना पाटील, अनिल भाईदास, विलास पाटील आदी कार्यकर्त्ये उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.