महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ कालावधीत होणार परीक्षा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेलेली शिक्षक पात्रता परीक्षा आता अखेर घेण्यात येणार आहे. यामुळे राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात लवकरच शिक्षकांच्या तब्बल 40,000 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देणार आहे. या परीक्षांचा कालावधी आता निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे अशांसाठी हे सुवर्णसंधी असणार आहे.

 

राज्याचा शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लवकरच अर्ज करण्याचं पोर्टल सुरु होणार आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 27 हजार आणि माध्यमिक शाळेतील 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून  ही परीक्षा लांबणीवर गेली होती. मात्र या वर्षी या परीक्षेला मान्यता देण्यात आली आहे. याआधी 2018-19 या शैक्षणिक वर्षांत  ही परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा रखडल्यामुळे लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावर्षी दुप्पट विद्यार्थी परीक्षेला बसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.