महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत कायम राहणार; मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

0

मुंबई: राज्यातील करोना स्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सर्वच मंत्र्यांनी आग्रह धरला. बैठकीनंतर तशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते १५ मे नंतरही कायम राहणार आहेत. त्यात कोणताही सवलत देण्याचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध कठोर केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. वाढत्या करोना रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यात बऱ्याच प्रमाण यश आले आहे. मात्र, अजूनही दैनंदिन रुग्णसंख्या मोठी असल्याने लॉकडाऊन १५ मे नंतरही वाढवण्यात यावा असे मत मंत्रिमंडळ बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. त्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असून यावर अंतिम निर्णय तेच घेतील, असे राजेश टोपे यांनी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.