चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील रोहिणी गावाजवळ भरधाव वेगाने धावणार्या कारने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथून नांदगावच्या दिशेने दुचाकीवरून दोन पुरुष, एक महिला आणि एक बालिका जात होते. दरम्यान, तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल नक्षत्रच्या पुढे एका भरधाव वेगाने धावणार्या स्वीफ्ट कारने या दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरील चारही जण जागीच ठार झाले, तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.