चाळीसगाव प्रतिनिधी – बिलाखेड येथे अल्पवयीन चिमूरडीवर नातेवाईक असलेल्या नराधम तरुणांने अत्याचार केल्याने नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोरातील कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी रयत सेना ,प्रगत युवा सेवाभावी संस्था, सुशील मित्र मंडळ व ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन टिम, चाळीसगांव यांच्या वतीने दि २१ रोजी पोलीस निरीक्षक व तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिडीत ८ वर्षीय चिमुरडीवर आई-वडील घरी नसतांना चिमुरडीचे अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी घेवून जाऊन तिच्यावर अनैसर्गिकरित्या अमानुष अत्याचार करणा-या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, तसेच, गेल्या काही दिवसांपुर्वी जळगांव जित्ह्यातील रावेर तालुक्यातील एका अदिवासी कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिच्यासह तिन भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने समाजात मुलींच्या सुरक्षेविषयी चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात पुन्हा घडु नये म्हणून अशा समाज विघातक नराधमाना
शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी . आंध प्रदेशातील दिशा कायदा महाराष्ट्रात ही लागू करण्याची मागणी रयत सेना ,प्रगत युवा सेवाभावी संस्था, खुशाल भाऊ मित्र मंडळ व ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन टिम यांच्या वतीने पोलीस निरीक्षक व तहसिलदारांना निवेदनाद्वारे दि २१ रोजी करण्यात आली आहे.निवेदनावर खुशाल मराठे,संजय कापसे,सचिन दायमा,भाऊसाहेब सोमवंशी,हेमंत पाटील,मंगेश कुमावत,विजय शर्मा,योगेश पाटील,विलास मराठे,देवेंद्र पाटील,भाऊसाहेब पाटील,भास्कर पाटील,मुकुंद गोसावी यांच्या सह्या आहेत