अमळनेर(प्रतिनिधी)-
बिलोली जिल्हा नांदेड येथील 29 वर्षीय मातंग समाजाच्या मतीमदं मुलीवर बलात्कार करून निघृण खुन करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बहुजन रयत परिषद अमळनेर कडून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्यातर्फे महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नांदेड जिल्यातील बिलोली येथे दि.9/12/2020 रोजी मातंग समाजाच्या 29 वर्षीय मतीमंद मुलीवर बलात्कार करून पुरावा नष्ट कारण्याच्या उद्देशाने तिचा दगडाने ठेचून निघृण खुन करण्यात आला. आरोपीला फाशीचीच शिक्षा मिळावी व पीडित कुटंबाला राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
या निवेदनावर प्रा.डॉ.विजय तुंटे, बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय मरसाळे,सल्लागार हरिश्चंद्र कढरे,शहराध्यक्ष सुरेश कांबळे,समाधान मैराळे,दिपक गरुड,लखन चंदनशिव,जितू कढरे,अजय कढरे,प्रेम बोरसे,सागर अवचिते आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.