अमळनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील गांधली येथील ग्रामस्थांनी आज दि. ३० शुक्रवार रोजी शेतीसाठी पूरक असा पाऊस पडत नसल्याने जिवंत माणसाची प्रेत यात्रा काढून आक्रोश केला. अंत्ययात्रेच्या माध्यमातून निसर्गाला, परमेश्वराला साकडे घातले आहे. दरम्यान गांधली गावातील युवक भिकन झावरू पाटील याने तिरडीवर झोपण्याचे धाडस दाखवले.अनेकांना ही जिवंत माणसाची काढलेली प्रेत यात्रा क्षणिक विनोदी वाटत असली तरी ती तालुक्यातील पावसाअभावी भीषण वास्तव दर्शवणारे चित्रण आहे.