चाळीसगाव :-चाळीसगाव तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने पावसाळ्यात जितका पाऊस तालुक्यात पाहिजे होता तेवढा सरासरीच्या अंदाजे पडला नाही तेवढा पाऊस गेल्या चार दिवसापासून तालुक्यात पडत असल्याने चाळीसगाव तालुक्यातील कोरडी असलेली धरणे तलाव, जवळपास पूर्ण क्षमतेने भरत आहे त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी राजा जरी हा पाऊस नुकसानदायक असला तरी समाधानी दिसत आहे कारण हंगामी पीक काढण्याच्या आशा शेतकरी राजाच्या पल्लवीत झाल्या आहे.