निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे येथे दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा दि,९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हजेरी लावून समाधान केले पावसाच्या मेहरबानी मुळे शेतकऱ्यांनी पुढील कामांना वेग दिला असून पिकांना रासायनिक खतांची पहिली मात्रा देणे कपाशी फासणे, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूगची कोळपणी करणे तसेच निंदणी करणे आदी कामे शेतकरी करतांना दिसत आहेत. पावसाचा लहरीपणा परीसतील ताडे भातखेडे हणमंतखेडेसिम पिंप्रीसीम बाम्हणे उत्राण येथे जाणवत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडले असून पाऊस पडत नसल्याने रासायनिक खतांच्या मात्रा देणे ही अवघड झाले आहे.
निसर्गाचे संतुलन बिघडल्याने कुठे पाऊस पडत आहे तर कुठे प्रतिक्षा करावी लागत असल्याने शेतकरी वर्ग हवादिल झाले आहेत. पाऊस यावा यासाठी शेतकरी परमेश्र्वराला साकडे घालत आहेत.