नागपुरात दोन गुंडांची हत्या

0

नागपूर : नागपुरातल्या खरबी चौकाजवळच्या रिंगरोडवर दोन गुंडाची हत्या केली गेली. सोमवारी मध्यरात्री उशीराची ही घटना आहे. बादल शंभरकर आणि संजय बानोदे या दोघांना, लक्ष्मी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट परिसरात ठार मारलं गेलं. तर त्यांचा तिसरा साथीदार राजेश यादव गंभीर जखमी झाला आहे.
या हत्याकांडामागे टोळीयुद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांतली हत्येची ही तिसरी घटना असून, यात चौघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूरमधलं गुन्ह्यांचं प्रमाण घटल्याचं सांगितलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच शहरातल्या खूनांच्या या सत्रानं, मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचीच पोलखोल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.