जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्यापुर्वी जळगाव खूर्द रेल्वे फाटाजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश दौलतराम खत्री (वय ४२, रा. सिंधी कॉलनी जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. सुरेश खत्री हे सिंधी कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मिळेल ती मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गेल्याकाही दिवसांपासून काहीही कारण नसतांना मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी भुसावळ रोडवरील खासगी रूग्णालयात २१ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
दरम्यान हॉस्पीटल जवळील काही अंतरावर असलेल्या जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या पुर्वी त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कोमल, मोहीत आणि मयूर ही लहान दोन मुले असा परिवार आहे.