नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात 46 हजार 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 979 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात देशात 58 हजार 578 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 9 हजार 607 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 96 हजार 730 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 72 हजार 994 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.