नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 54 हजार 69 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 321 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात भारतात 68 हजार 885 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 82 हजार 778 वर गेला आहे. देशात 2 कोटी 90 लाख 63 हजार 740 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 91 हजार 981 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 6 लाख 27 हजार 57 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 30 कोटी 16 लाख 26 हजार 28 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.