नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. 88 दिवसात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 54 हजारांच्या खाली गेला. गेल्या २४ तासात ५३ हजार २५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ४२२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. २४ तासात देशात 78 हजार 190 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 99 लाख 35 हजार 221 वर गेला आहे. देशात 2 कोटी 88 लाख 44 हजार 199 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 88 हजार 135 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 7 लाख 2 हजार 887 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 28 कोटी 36 हजार 898 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.