तळेगाव (प्रतिनिधी) टाकळी खु ता जामनेर येथे अंगण वाडी क्रमांक19 मध्ये 16 मार्च ते 31 मार्च पोषण पंधरवडा अभियान राबविण्यास सुरवात झाली असून यासाठी या अंगणवाडी सेविका सौ उज्वला कृष्णा चौरे व मदतनीस छाया रामदास जाधव या परिश्रम घेत असून यात घरोघरी जाऊन पोषण पंधरवडा हे अभियान नेमके काय आहे हे समजून सांगत असून यात गरोदर ,स्तनदा माता व किशोरी मुली,कुपोषित बालकांच्या घरो घरी जाऊन , पौष्टिक आहारा बाबत, अनिमिया बाबत .हात वारंवार धूने बाबत ,आरोग्याबाबत ,परिसर स्वच्छते बाबत जनजागृती केली जात असून प्रत्यक्ष गृहभेटी घेतल्या जात आहे याकामी पर्यवेक्षिका जया जाधव बाल विकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंधरवडा यशस्वीरित्या राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.