जामनेर (प्रतिनिधी): – येथील कस्तुरी नगर, जामनेर पुरा व इंदिराआवास या भागांमध्ये कोरोना ह्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्याने मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा रहाटगाडा चालवनाऱ्या गोरगरीब लोकांना पाच कीलो गहू आटा, तेल पाकीट, साबण आदि किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले. तर माळी गल्ली ह्याभागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्या चे नेते संजय गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रफुल्ल लोढा यांच्या हस्ते गरजू लोकांना किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले . ह्यावेळी काँग्रेसचे शंकर राजपूत ,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे. संदीप हिवाळे, प्रभू झाल्टे ,काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष दीपक राजपूत तसेच काँग्रेस,राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.