- सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
जळगाव | प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने
जळगाव शहर, अमळनेर , भुसावळ आणि चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
या बाजार समित्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. जळगाव बाजार समितीतही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दोन-तीन दिवसात पाहण्यात आले होते.