जळगाव । प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्येत मोठा दिलासा मिळाला. मागील गेल्या दोन दिवसात नवीन रुग्ण संख्या १५ च्या आत आढळून येत होती त्यात किंचित वाढ झाली आहे. आज शुक्रवारी दिवसभरात २० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, मागील आठवड्यापासून जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
जळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-०१, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०२, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-१०, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण २० बाधित रूग्ण आढळून आले आहे.