जळगाव । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, जळगावात संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या सात जणांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्यावर संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मयूर दगडू सोनवणे (वय-२१) रा. सुप्रिम कॉलनी, बाळू सिताराम धनगर (वय-५२) रा. सुप्रिम कॉलनी, दगडू पंढरीनाथ घुगे (वय-५०) रा. जोशीवाडा, मेहरूण, प्रमोद सुपडू घुगे (वय-४७) रा. सुप्रिम कॉलनी, जितेंद्र अण्णा टिळंगे (वय-२४) रा. जाखनी नगर, कंजरवाडा, उमेश पंढरीनाथ अहिरे (वय-२१) रा. पंचमुखी हुनमान मंदीराजवळ, लाठी शाळेजवळ, ईश्वर बहारूमल मेथनी (वय-५४) रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी यांच्यावर पोहेकॉ मुद्दस्सर काझी यांच्या फियादीवरून सात जणांविरोधात जमावबंदी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, पोउनि विशाल सोनवणे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. नितीन पाटील, पो.कॉ. प्रविण मांडोळे, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर, असिम तडवी, मुदस्स काझी, इम्रान अली सैय्यद, लुकमान तडवी यांनी ही कारवाई केली.