चिंताजनक ! कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानावर

0

मुंबई : देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानावर आला आहे. हि देशासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजारांवर गेला आहे.दिलासादायक बाब म्हणजे भारतात 1 लाख 47 हजार हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. 24 तासात सर्वाधिक 396 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक 10 हजार 956 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजार 535 झाली आहे. यातील 1 लाख 47 हजार 195 बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 49.47 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 14 हजार 842 रुग्ण देशात आहेत.

गेल्या 24 तासांत 6 हजार 165 रुग्ण बरे झाले तर 396 मृत्यू कोरोनामुळं झाले आहेत. देशात एकूण बळींची संख्या 8 हजार 498 झाली आहे. या महिन्याच्या 1 तारखेला कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 होती. आज 2 लाख 97 हजार 535 म्हणजे गेल्या बारा दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 7 हजाराने वाढली आहे. 9 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित वाढण्याचा 4 जूनपासून सलग नववा दिवस आहे.

महाराष्ट्रात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.