चाळीसगाव कांग्रेसच्या वतीने भाजपाचा जाहीर निषेध

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : केंद्रातील मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत तेथे हे राजकीय अस्थिरता निर्माण करून ती सरकारी पाडण्याचा खेळ सुरू केला आहे उदाहरणार्थ गोवा ,कर्नाटक ,मध्य प्रदेश, व आता राजस्थान येथे हा खेळ सुरू केला आहे. अशा प्रकारे देशातील समृद्ध अशा लोकशाहीचा पायाच खिषखिळा करण्याचा प्रयोग हे भाजपप्रणीत केंद्राचे सरकार करीत आहेत. राजस्थानचे राज्यपाल माननीय कलराज मिश्रा यांनी तातडीने राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावून तेथे बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेस,व सेवादलाच्या वतीने चाळीसगाव येथील नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष अनिल निकम ,शहराध्यक्ष देवेंद्र पाटील ,तालुका सेवादल अध्यक्ष रमेश चौधरी ,माजी आमदार ईश्वर जाधव ,रमेश शिंपी, मंगेश अग्रवाल, प्रदीप देशमुख, सुनील राजपूत, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोडे, अॅंड. संदीप सोनार, कमलेश येवले , काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.