नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाची संख्या ५०० च्या वर गेली आहे. तसेच आतापर्यंत १० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे भारत भीतीच्या छायेत आहे. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा रात्री ८ वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार आहे,
मागील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या कर्फ्यूला देशातील नागरिकांना चांगला प्रतिसादही दिला. दरम्यान, आजच्या भाषणात पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.