कर्जमुक्तीसाठी १६ हजार शेतकऱ्यांची यादी प्राप्त

0

जळगाव । महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची चौथी यादी सहकार विभागाला प्राप्त झाली आहे.

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. ही यादी बँकांकडे पाठवण्यात आलेली आहे. ही यादी एप्रिल महिन्याची आहे. मे महिन्यात नवीन यादी प्राप्त झालेली नाही. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे बायोमेट्रिक थम्स घेणे बंद असल्याने सध्या कर्जमुक्तीची प्रक्रिया थांबली आहे.

युती सरकारच्या काळात पात्र शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. त्यासाठी ओटीएस योजना लागू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, विद्यमान आघाडी सरकारने जुन्या ओटीएस योजनेबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत दीड लाखांवरील कर्जाची परतफेड न केलेल्या जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना ओटीएसचा लाभ मिळाला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.