एरंडोल :- तालुक्यात उत्राण येथे अतिवृष्टीमुळे शेत जमीन व घरांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे कृषी सहाय्यक, तलाठी मंगळवारपासून सुरू करणार आहेत. अशी माहिती एरंडोल तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. उत्राण येथे अतिवृष्टीचा तडाखा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या अतिवृष्टीत प्राणहानी झाली नसली तरी घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे तसेच शेतजमिनीचे बांध फुटून शेतामध्ये पाणी घुसल्याने अपरिमित नुकसान झाले आहे.
दरम्यान तालुका प्रशासन व तालुका कृषी विभाग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.