आषाढी वारी यंदाही बस नेच ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

0

पुणे : आषाढी वारी यंदाही बस नेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी आज दिली. यंदा पायी वारी ला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील वारी बस नेच जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १० महत्वाच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे.

दहा मानाचा पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यानमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाखरी पर्यंत हा पालखी सोहळा बस ने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल. महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव सध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले,” अनेक जणांची यंदा पायी वारी साठी मागणी होती. मात्र ते करू नये अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येत नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.