उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच नुकसान देखील आहेत. त्याबाबत जाणून घेऊ…
आंबे खाण्याचे फायदे :
– आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक आहे.
– आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकवा येतो थकवा वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.
– आंब्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
– चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त.
-शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात.
-शरीर आतून स्वच्छ होते.
-व्हिटामिन बी6′ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी.
– आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
– आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
आंबे खाण्याचे नुकसान :
– कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.
-आंब्याचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
-आंब्याला पिकवण्यासाठीअनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो.
-आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते.
-ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
-आंबा हे गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात