अतिवृष्टीच्या पाण्याने नेरी येथे घराची भिंत पडली

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील मयत शांताबाई महारु तिळवणे यांच्या राहत्या घराची भिंत पडल्याची घटना घडली आहे. अतिपावसाने नेरी दिगर येथील रहिवाशी रविंद्र महारु तिळवणे हे रहिवाशी असुन गेल्या दोन ते तीन दिवसापासुन पावसाच्या संततधार आगमनाने हाहाकार माजला असुन शेतातील पिकांसह घरांची पडझड मोठया प्रमाणात होतांना दिसत आहे .

दोन दिवसा पासुन जोरदार सुरू होता.  यामुळे परिसरातील बाकी असलेली धरणक्षेत्रही पूर्णपणे भरून सांडवा निघून नदी-नाल्यांना जोरदार पुर सुरू आहे. अति मुसळधार पाऊस उगमस्थानापासून ते परिसरात सुरु असल्याने मध्यरात्री वाघुर  नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेपर्यंत पोहोचले होते, म्हणजेच नदीला महापूर आलेला होता. वाघुर नदीच्या तीरावर असलेल्या रहिवाशी रवींद्र तिळवणे यांच्या राहत्या घराची भिंत मध्य रात्री कोसळली . सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवित हानी यात झाली नाही .परंतु त्यांचा संसार उघडयावर पडला असुन रीतसर शासकीय पंचनामे करुन शासनाच्या वतीने  नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.