लोकशाही न्यूज नेटवर्क
सोलापूर – 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपद येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि स्त्री शक्तीचा जागर या विषयावर साकारण्याचं काम दिल्लीत युद्ध पातळीवर सुरू आहे. या साडेतीन शक्तीपीठांमध्ये कोल्हापूरची अंबाबाई मंदिर, तुळजापूरची भवानी मातेचे मंदिर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्री शक्ती जागर या विषयावर चित्ररत असेल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला श्रमाजीवी वर्गाला मानाच्या रांगेत बसवलं जाणार आहे.
यावर्षीची संकल्पना रेखाचित्र आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. 30 जणांचा समावेश असलेल्या युवक मूर्तिकार आणि कलाकारांची टीम 26 जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररत परिपूर्ण करण्याचं काम करत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.