दोघं दहशतवाद्यांना कंठस्नान; तीन भारतीय जवान शहीद…

0

 

जम्मू , लोकशाही न्यूज नेटवर्क;

आज सकाळी राजौरीपासून 25 किमी अंतरावर दोन दहशतवाद्यांनी लष्कराच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघाती हल्ला केला होता. यावेळी भारतीय जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर यामध्ये 3 जवान कारवाई करतांना शहीद झाले आहेत. सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

सूबेदार राजेंद्र प्रसाद, राइफलमॅन मनोज कुमार आणि राइफल मॅन लक्ष्मणन डी. या तीन भारतीय जवानांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी परगलमधील लष्करी छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दोन्ही बाजूने चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूने सुरु झालेल्या गोळीबारात दहशतवादी मारले गेले. तर तीन भारतीय जवान शहीद झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.