राजकारणात यायचे गेंड्याची कातडी पांघरूनच !

माझ्या उमेदवारीच्या चाव्या कुणी फिरवल्या? : राजू शेट्टींचा इशारा

0

कोल्हापूर, लोकशाही न्युज नेटवर्क 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडलं आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले असून येत्या 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे गेले महिना दोन महिने रात्रंदिवस प्रचारामध्ये झोकून दिलेले उमेदवार आता निकालाची प्रतीक्षा करत असून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या निवडणुकीनंतर देखील आपल्या मतदार आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत सर्वांचे आभार व्यक्त करत आहेत. तसेच आपल्या वयोवृद्ध आईसोबत वेळ घालवण्यात राजू शेट्टी सध्या व्यस्त असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात आणि मतदारसंघात विकासाच्या ऐवजी जाती धर्मावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न काहींनी केला हे चुकीचे आहे. मात्र, मी विकासाच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच या निवडणुकीला सामोरे गेलो. ऊस उत्पादकांचे अनेक प्रश्न आहेत. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत, विजेचा लपंडाव अद्याप देखील सुरू आहे. कापूस, सोयाबीन यांना भाव नाही. मोठमोठ्या उद्योगपतींना कर्ज मिळते मात्र राईट टू एज्युकेशनचा कायदा असताना देखील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज मिळत नाही. साखर कारखानदारांच्या कर्जाची हमी सरकार घेते तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेल्या कर्जाची हमी सरकार का घेत नाही? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत विरोधकांनी राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली होती. याबाबत त्यांना विचारले असता राजू शेट्टी यांनी राजकारणात येणाऱ्या प्रत्येक माणसाने गेंड्याचे कातडी पांघरून आले पाहिजे असे म्हणता. मात्र मी संवेदनशील आहे. या निवडणुकीत मी साखर कारखानदारांबरोबर संगनमत आहे. तसेच माझी 2000 एकरपेक्षा अधिक जमीन झाली आहे. असे अनेकांनी माझ्यावर तोंड सोडून आरोप केले. हे ऐकून मनाला फार वेदना झाल्या. कोणीतरी फालतू माणूस असे आरोप करून जातोय यामुळे एकेकाळी सर्व सोडून द्यावे अशी मला वाटत होते. मात्र सर्वसामान्य माणसाची चेहऱ्यावरील वेदना पाहून पुन्हा पुढे जात राहिलो आणि यामुळे सर्वसामान्य माणूस माझ्यामागे ठामपणे उभे होता. अगदी उमेदवारीचा अर्ज भरण्यापासून ते प्रचार संपायच्या दिवशीपर्यंत अनेकांनी माझ्यासोबत मोठी गर्दी होती. संपूर्ण निवडणुकीत केवळ सर्वसामान्य माणूस हीच माझी ताकद होती. तसेच प्रहार पक्ष आणि काही संघटना वगळता कोणत्याही प्रस्थापित नेत्याने किंवा पक्षाने मला पाठिंबा दिला नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच येत्या 4 जूनला हातकणंगले होतो मी बहुमताने निवडून येत आणि कमीत कमी खर्चामध्ये देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाणार एकमेव खासदार असेन असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी ही चर्चा फिसकटली आणि ठाकरे गटाने येथे सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राजू शेट्टी यांचा सुखकर असणारा विजय हा अवघड झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान महाविकास आघाडीबरोबर ही चर्चा का फिसकटली यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी अनेक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडीबरोबर जायचे नाही हे आमचा आधीच ठरले होते. यापुढे चळवळ आणि आपण एकट काम करायच असे कार्यकारणीच्या सभेत ठरवलेल होते. मात्र येथील विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिवसेना सोडून शिंदे गटासोबत गेल्याने धैर्यशील माने यांना धडा शिकवायचा अशी भावना शिवसैनिकांची होती यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची मी खासदार म्हणून निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचे मला सांगितले होते आणि तसेच मी त्यांची भेट घ्यावी असे शिवसैनिकानी इच्छा व्यक्त केली. यामुळे मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी देखील मी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये येणार नाही हे स्पष्ट केले होते.

शेतकरी हिताला प्राधान्य!

यंदा मी खासदार झालो की गेल्या टर्मला माझं एक काम अपूर्ण राहिल होते. ते म्हणजे मागच्या वेळी एम एस पी गँरटी कायद्याचे विधेयक मांडले होते. मात्र, त्यावर दुर्दैवाने चर्चा होऊ शकली नाही. यामुळे सध्या संपूर्ण भारतातील शेतकरी हा कायदा मंजूर व्हावा यासाठी मागणी करत आहेत आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र आता मी खासदार झालो की पहिल्यांदा हा विधेयक पुन्हा मांडून त्याचा कायदाच रूपांतर करायच आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान हमीभाव कायद्याचे संरक्षण द्यायचे हे माझं उद्दिष्ट आहे. या सोबतच मतदारसंघातील आणि विद्यार्थी, महिला, सुळकुड पाणी योजना यासारखे यांचे अनेक प्रश्न आहेत जे मला संसदेत मांडायचे आहे आणि ठाम भूमिका घ्यायला सरकारला भाग पाडायचे आहे असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.