जालना
गेल्या दहा दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी जालन्यात वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु होतं. काल सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलं. आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारच्या शिष्टमंडळाने पटवून दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळात पाच मंत्र्यांसह १२ जणांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाल्यानंतर एअर पोर्ट्वरच शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यात वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले.
ही फक्त तात्पुरती स्थगिती
“आपलं आंदोलन दहा दिवसांपासून सुरू आहे. मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एकदोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावर सरकाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचं शिष्टमंडळाला विनंती आहे. गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजमधील आरक्षण पेंडिग आहे. आमची ५६ हजार गावे वंचित आहे. एक हजार पंचायत सदस्य भेटून गेले आहेत. शासनाने कोर्टात काही विनंती केली पाहिजे. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्याला डावललं जात आहे हे समजू नये. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आताचं आंदोलन स्थगित करत आहोत” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
हे होते सरकारचे शिष्ट मंडळ
सरकारच्या शिष्ट मंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री होते. गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा आहेत. जालना वडीगोद्रीत ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली आहे. उपोषणस्थळी ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली होती.