जळगाव ;- सुवर्णनगरी म्हणून ओळख आलेल्या जळगाव शहरात आज सराफा बाजारात चांदीचे भाव वाढले असून चांदी येत्या काही दिवसांत एक लाखांपर्यंत पोहचेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
सोन्याच्या पाठोपाठा चांदीच्या भाव तेजीत असल्याचे दिसून आले. सात दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावात गेल्या आठवड्यात वाढल्यानंतर घसरलेले सोने, चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने ३०० रुपये तोळा तर चांदी किलोमागे २ हजार रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.तर आज बुधवार २९ रोजी सोने दीडशे रुपयांनी स्वस्त होऊन ७२ हज़ार २४० रुपये प्रति दहा ग्राम इतके होते तर चांदी प्रति किलो ९५ हजार ७८० रुपये इतकी झाली .