प्रवचन सारांश – 22/10/2022
या दिवाली, पर्वान भगवान महावीर (तीर्थंकर) यांनी अंतिम संदेश दिला. दिवाळी पर्व, तथा वीर निर्वाण कल्याणक दिवस आहे असे पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनात केले.
राजा हस्तीपाल यांनी चातुर्मास विनंती करताना आपला अंतिम चातुर्मास माझ्या नगरीत पावापुरी’ येथे करावा असे भगवान् महावीर यांना विनंती केली. हस्तीपात राजात कसे कळते ? राजाला आठ स्वप्न कोणते पडले होते? त्याबाबत येत्या प्रवचनात सांगण्यात येईल. असे सांगून धनतेरस दिवाळी पर्वा विषयी देखील डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी उपस्थितांना प्रवचनाच्या माध्यमातून सांगितले.
ज्या देवीचे जसे कार्य असते तसे नाव त्या देवींना दिले जाते. कल्पसूत्राच्या 14 स्वतांमध्ये लक्ष्मी देवीचे वर्णन आले आहे. आचार्य जयमलजी महाराज यांनी लक्ष्मी बाबत लिहून ठेवले, सांगितले आहे. विदेशात तर लक्ष्मीची पूजा करत नाहीत तरी त्यांच्याकडे लक्ष्मी असतेच ना! लक्ष्मी पूजेच्या औचित्याने शेठ सागरदत्त यांची कथा त्यांनी प्रवचनात सांगितली. आधी लक्ष्मीचा वास होता असे पण दरिद्रता आलेल्या सागरदलता येते. त्यांच्या अवती भवती घरात दिवाळीची तयारी सुरु असते. घरातले शेजारील मुलं सागरदत्तच्या लहान मुलासमोर चिडविण्यासाठी खातात. तो आईकडे जातो व मिठाईचा हट्ट करतो. मोठे आहे तो कर्ज घेणार नाही ज्यावर तो पक्का असतो. शेठाणी कौशल्याने घर चालवायची, मुलगा तहान भुकेने व्याकूळ मुलाला मिठाई देऊ शकत नाही याचे वाईट वाटते. संकट येतात तर ते चारही बाजूने येत असतात. उजडलेले गाव पुन्हा बसते, धनिक गरीब झाला तर तो पुन्हा धनिक होतो; मात्र मृत्यू झाल्यावर प्राण पुन्हा येत नाही. शेठ दिवाळीची सफाई करतात. शेठ सागरदत्त यांची विशाल हवेली असते. व्यक्तीला परीग्रह फार असते. आपल्या घरात विनाकारण ही संग्रह करतात. आजच्या धनतेरसच्या दिवशी हा संकल्प करावा संग्रह करायचाच असेल तर कामी येणारी वस्तू संग्रह करा. शेठजी- शेठाणीने कचरा विकून धन कमावले, दिवाळी कशी साजरी होते याबाबत प्रवचनातून सांगितले गेले.
———□■□■ ————
पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…