कपाशीच्या दरातील वाढ कायम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई – देशातील बाजारात कापसाचे नरमलेले दर मागील चार दिवसांपासून सुधारत आहेत. आजही देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत वाढले होते. आज देशात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

राज्यातही यादरम्यान भाव होता. शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या अपेक्षित दरपातळीवर टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केल्यास फादेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.