Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बाल कल्याण समीतीच्या सतर्कतेने मेळघाटातील शेतात होणारा बालविवाह वेळीच हाणून पाडला
    गुन्हे वार्ता

    बाल कल्याण समीतीच्या सतर्कतेने मेळघाटातील शेतात होणारा बालविवाह वेळीच हाणून पाडला

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    अमरावती ; बालविवाह थांबवण्याबाबत शासनाकडून बऱ्याच प्रमाणात जनजागृती व उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अजूनही जिल्हाभरात मुलींचे अठरा वर्षा पेक्षा कमी वयात लग्न करण्याचे प्रकार सुरूच आहेत . असाच एका बालविवाहाचा प्रयत्न फसल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मडकी गावात समोर आला .

    चिखलदरा तालुक्यातील मडकी गावातील मुलीचा विवाह परतवाडा येथील एका शेतात 17 मार्च रोजी दुपारी चार वाजता संपन्न होणार होता. शेतात विवाह मंडप सजवण्यात आला होता . वर्‍हाडी पाहुणे मंडळी सुद्धा आली होती . नवरी नवरदेव नटले होते .

    भोजनाचा सुगंध मंडपात दरवळत होता. सर्व वर्‍हाडी आनंदाने लग्न घटीकेची वाट पाहत होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना . लग्न लागण्याची वेळ जवळ आली असताना परतवाडा पोलीस स्टेशनला अमरावती येथील बाल संरक्षण अधिकारी यांनी तक्रार केली की परतवाडा येथील एका शेतात होणाऱ्या विवाहातील वधू ही 14 वर्षे वयाचीच आहे.

    तेव्हा हा विवाह थांबवावा. यावर लगेच अंमलबजावणी करत परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अमरावती येथील समुपदेशक आकाश बरवट  शेतात पोचले अन हा विवाह तुम्हाला कायद्याने करता येणार नाही .असे वधूपिता- वरपित्यासह  सर्वच वर्‍हाडी मंडळींना ठणकावून सांगितले.

    त्यानंतर विवाह थांबविल्या गेला. व समुपदेशक आकाश बरवट यांनी नवरी मुलीला घेऊन अमरावती येथे आणले व त्या ठिकाणी बालकल्याण  समितीसमोर हजर केले . मात्र विवाह रद्द झाल्याचे पाहून दोन्ही पक्षाकडील मंडळीच्या पदरी निराशा पडल्याने . त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व वराकडील मंडळींना आल्यापावली तसेच परत जावे लागले .

    Amravati news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif