पहूर ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील पाळधी शिवारातून १२ क्विंटल कापूस सात जणांनी लंपास नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश दामू सुशिर (वय ६९, रा. पाळधी ता. जामनेर जि.जळगाव) यांचे पाळधी शिवारात शेत आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील भावलाल दामु सुशिर (वय ७१), परमेश्वर भावलाल सुशिर (वय २७), ज्ञानेश्वर भावला सुशिर (वय ३२), दिलीप माधव सुशिर (वय ४५), संजय माधव सुशिर (वय ४३), राजेश माधव सुशिर (वय ४१) आणि बेबाबाई दिलीप सुशिर (वय ४१) रा. पाळधी यांनी शेतातून ८० हजार रूपये किंमतीचे १० ते १२ क्विंटल कापूस लंपास केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी रमेश दामू सुशिर यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे.