हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाज्यांमधून नदीत पाणी

0

तापीला महापूर : सतर्कतेचा ईशारा

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार झाल्याने बुधवारी रात्री 10 वाजेपासून धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात 78 हजार 929 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. हतनुर धरणाची धोक्याची पातळी 214 आहे आणि आता 209.330 या लेव्हल वर पाणी पोहोचल्याने धरणाचे सर्व गेट उघण्यात आली आहे. हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.