प्रतिनिधी | बाेदवड
राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या नियम आणि अटीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याबाबत बुधवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एस.बी. तीर्थकर यांना निवेदन दिले.
तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर भारिप तालुकाध्यक्ष सुपडा निकम, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरळकर, जिल्हा सचिव गोपीचंद सुरवाडे, शेख कलीम शेख खलील, सुरेश तायडे, जगन सुरवाडे यांच्या स्वाक्षऱ्या अाहेत.