लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
परिसरात पावसाची बेरहमी दिसून येत आहे. आज पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. कडाडून चमचम करणाऱ्या विजांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. कारण जिल्ह्यात अंगावर वीज पडून मृतकांच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची तेव्हापासूनच काहीतास वीजही गुल झाली.
दिवसभरात विजेचा लपंडाव सुरूच होता काही दिवसांपासून नदी-नाले दुथडी खळखळून वाहत आहे. जवळपास सव्वा तास झालेल्या पावसाची भर पडली त्यामुळे नदीच्या जोरदार प्रवाहात पुन्हा भर तर पडलीच पण काही मिनिटातच लेंडी नाल्याला पूर आला फरशी वरून पाणी वाहत असल्याने काही तास येथील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळपासूनच जनजीवन विस्कळीत झाले असून गुरढोर मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. अगोदरच अति पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. अशाच प्रकारे पाऊस बेरहमीने सुरूराहिल्यास उरलीसुरली ही पिके खराब होऊन नाश होतील असे चित्र परिसरात दिसू लागले आहे.