लासुर ता.चोपडा(वार्ताहर) : तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया लासुर शाखेचे व्यवस्थापक यांचा अहवाल पॉझोटीव्ह आल्याने उद्यापासून दि २३ ते २७ जूनपर्यंत जनता कर्फ्युचे आयोजन केले आहे. त्यामुळे ५ दिवस गावातील सर्व व्यवसाय कडकडीत बंद राहतील तसेच इतर गावातील शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल गावात ५ दिवस विक्री करू नये.
बंद काळात गावातील फक्त मेडिकल सुरू राहील व कृषी केंद्र सकाळी ८ ते दुपारी ११ पर्यंत आणि दुपारी ५ ते ७ सुरु राहतील व इतर सर्व व्यवसाय कडकडीत बंद राहतील असे आवाहन ग्रामपंचायत लासुर यांचा वतीने करण्यात आले. ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर फिरू नये व प्रत्येकाने तोंडाला मास्क किवा रुमाल बांधणे सक्तीचे असून जनता कर्फ्युचे सर्व ग्रामस्थांनी पालन करावे असे सरपंच जनाबाई माळी, उपसरपंच अनिल वाघ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आवाहन केले आहे.