लष्करी अळीमुळे मका पिकाचे मोठे नुकसान

0

-शेतकऱ्यांना भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी। 

जामनेर (प्रतिनिधी ) : – मका पिकावर “लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. असुन,शासनाने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या सर्वंकष नुकसानिची आर्थीक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (३) तहसिलदार नामदेव टिळेकर यांच्या कडे करण्यात आली. राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की यंदा मोठ्या शेती क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे,कणसे भरण्यावर आली असतांनाच लश्करी अळीने हल्ला सुरू केल्याने संपुर्ण पिकाचे नुकसान झाले आहे.तरी संपुर्ण क्षेत्रावरील पिक विम्याची नुकसान भरपाई मिळावी,मक्याची लागवड करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना संपुर्ण लागवडी क्षेत्रातील नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आदीचा समावेश आहे. तहसिलदार नामदेव टिळेकर यांचेकडे मागण्यांचे निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय गरूड,जिल्हा युवक सेलचे अध्यक्ष रवींद्र पाटील,माजी तालुकाध्यक्ष भगवान पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील,अभिषेक पाटील,माधव चव्हाण,सुनिल पाटील,वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,युवक शहराध्यक्ष विनोद माळी,माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख,शैलेश पाटील,अमोल पाटील,कैलास पाटील,श्याम सावळे,जितेश पाटील,सागर कुमावत आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.