नवी दिल्ली : संकटात सापडलेल्या येस बँकेच्या ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठक झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या तीन दिवसात बॅंकेवरील निर्बंध दूर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भारतीय स्टेट बँक येस बँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करणार असल्याने सरकारने बँकेवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येस बँकेत खासगी बँकांनीही गुंतवणूक करण्याची तयारी दाखली आहे. आयसीआयसीआय बँकने एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेची येस बँकेत पाच टक्के गुंतवणूक असेल. रिझव्र्ह बँकेच्या पुनर्रचनेच्या योजनेसंदर्भात सहा मार्च रोजी मसुदा जाहीर केला गेला होता व हरकतीही मागितल्या होत्या. त्यानुसार योजनेला अंतिम स्वरूप दिले गेले आहे.
या योजनेनुसार स्टेट बँकेची ४९ टक्के गुंतवणूक असेल. स्टेट बँकेला किमान तीन वर्षे २६ टक्के गुंतवणूक येस बँकेत कायम ठेवावी लागेल. खासगी गुंतवणूकदारांसाठी ही मर्यादा ७५ टक्के इतकी असेल.