यावल (प्रतिनिधी) : शहरालगत असलेल्या नविन वाढीव वस्त्यांमधे पालीकेकडून टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी कमी जादा दराने काम दिल्याचा आरोप आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते दिपक बेहेडे व काँग्रेसचे गटनेते स् युनुस स.युसुफ यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांचेकडे दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे की, मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कमी दराची निविदा स्थायी समीतीसमोर न ठेवता कंत्राटदाराशी आर्थिक संगनमत करून वाढीव दराचे निविदाधारक कंत्राटदारास पाईपलाईन च्या कामास मंजुरी दिली असल्याने पालिकेचे सुमारे ५० लाखाचे आर्थीक नुकसान केले असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते दिपक बेहेडे व काँग्रेसचे गटनेते सैय्यद युनुस सैय्यद युसुफ यांनी निवदेनात केला असून, या सर्व आर्थीक गोंधळात जबाबदार असलेले मुख्याधिकारी बबन तडवी यांना तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी तक्रार निवेदनाव्दारे केली आहे. गेल्या ३० वर्षात शहरालगत झालेल्या विस्तारीत वस्त्या मध्ये पाईपलाईन नसल्याने पालीकेकडून पाणीपुरवठा केला जात नव्हता. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सद्या पाईपलाईन टाकण्याचे कामे सुरू आहे.
शिवसेनेचे गटनेते दिपक बेहेडे वकाँग्रेसचे गटनेते सैय्यद युनुस सैय्यद युसुफ यांनीजिल्हाधिकारी यांचेकडे दिलेल्यानिवेदनात म्हटले आहे की,वृत्तपत्राच्या ईटेंडरनुसार या कामासाठी पाच कंत्राटदारांनी निवीदा भरलेल्या होत्या, मात्र मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कमी दराची आलेली सुनिल पाटील यांची निविदा अपात्र करून स्थायी समीतीसमोर चार निविदा धारकांची यादी ठेवली त्यात अमळनेरचे एस कुमार कन्स्ट्रक्शन कंपनीशी संगणमत करून त्यांना कंत्राट दिला आहे. यात पालीकेचे नुकसान झाले असल्याने त्यांना त्वरीत निलंबन करावे व कामास स्थगीतीद्यावी अशी मागणी केली आहे.
निविदा प्रक्रियेचे काम नियमाप्रमाणे आहे यात कोणतेही काम चुकीचे केलेले नाही असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिले आहे.