मोदी नवाज मालिकांच्या घरी जाऊन बिर्याणी खायची- जितेंद्र आव्हाडांची चाळीसगावात सभेत टीका

0

चाळीसगाव :- आज चाळीसगाव येथे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारार्थ निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयवंतराव पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक मेळावा घेण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते आव्हाड म्हणाले मागील २०१४च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी जनतेला खोट्या आश्वासन देऊन मोठ-मोठी स्वप्न दाखविली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देईल असे सांगितले होते. सत्तर वर्षांच्या इतिहासात मोदींच्या काळात अधोगती झाली. पंतप्रधान मोदी पाकिस्तानच्या नावाने मते मागायची. मोदी नवाज मालिकांच्या घरी जाऊन बिर्याणी खायची अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाषणातून बोलताना दिली.

बारामती माझ्या हातात द्या असे म्हणणारे गिरीश महाजन यांच्यावरही आव्हाड यांनी टीका केली. देशात गरीब असेल पैशांची मस्ती उतरवा. सत्तेची मग्रुरी उतरवा असे आवाहन आव्हाड यांनी उपस्थितांना केले. काँग्रेसने काय केले हे मोदी सांगतात. मात्र त्यांना काँग्रेस काय आहे हे माहित नाही. आम्ही गांधींचे चेले आहोत. हिंमत असेल तर गोळवलकरांच्या नावाने मते मागा. आधुनिक काळातले वाल्मिकी आहेत. रामाचा वनवास १४ वर्षांचा असतो मात्र आता साडेचार वर्षांचा वनवास आहे. मंदिर वही बनायेंगे. पण केव्हा हे कुणी सांगत नाही . रामाच्या नावावर किती दिवस राजकारण करणार असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अरुणभाई गुजराथी, माजी आ. राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, मनीष जैन, अनिल पाटील, करणं खलाटे, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.