मुंबई :- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा (बीसई) व्यवहार उसळी घेतच सुरू झाला. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीतही ७९. ३५ अंकांनी वाढ झाली.
आज सेन्सेक्स ३२९.९२ अंकांच्या (०.८४%) तेजीसह, तसेच निफ्टी ८४.८० अंकांच्या (०.७१%) अनुक्रमे ३९.८३१.९७ अंक आणि ११,९४५.९० अंकांवर बंद झाले. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर २४ कंपन्यांचे समभाग हिरव्या रंगात, तर ६ कंपन्या लाल रंगांवर होत्या. तर, एनएसईवर ३३ कंपन्यांच्या समभागांची खरेदी, तर १७ कंपन्यांच्या समभागांची विक्री सुरू होती.