मुक्ताईनगर येथे महाराष्ट्रात घडत असलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात निवेदन

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर येथे दिनांक १७ जुन रोजी महाराष्ट्रात घडत असलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मुखमंत्री, यांना तहसिलदार मुक्ताईनगर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. या घटनेतील आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे. शिवाजी महाराज- फुले- शाहु- आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा ठसा या राज्यातील तमाम जनतेवर आहे.असे असतानाही या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत राज्यात जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राची शान मात्र धुळीस मिळवली गेली आहे. त्यातील काही घटना, अरविंद बनसोडे रा. पिपळधरा जि. नागपूर, याची २७ मे रोजी जातीयवाद्यानी भर रस्त्यात हत्या केली. विराज जगताप रा. पिंपळे सौदागर जि. पुणे या बौद्ध तरुणावर सहा ते सात जातीयवाद्यानी हल्ला केला त्यात तो मरण पावला. दगडु धर्मा सोनवणे रा. महिंदळे ता. भडगाव जि. जळगांव या इसमाच्या घरावर ७ जुन रोजी हल्ला केला घरातील स्त्रियांच्या अंगावर हात टाकून विनयभंग केला महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली. साळापुरी जि. परभणी येथे पाच बौद्ध तरुणावर पंधरा ते सोळा जातीयवाद्यानी भीषण हल्ला केला. राहुल अडसूळ कोरेगाव जि. अहमदनगर येथे गावातील जातीयवादी लोकांनी मिळून हल्ला केला. चंदनापुरी खुर्दी जि. जालना येथे बौद्ध परिवाराला वीस ते पंचवीस जणांनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली. मंठा जि. जालना येथील दलीत शिक्षकाला गावातील जातीयवादी लोकांनी केलेल्या शिवीगाळ व मारहाणला कंटाळून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. निळा जि. परभणी या गावातील बौद्ध महिला सरपंचांना गावातील कुटुंबांना कोरोना काळात शाळेत क्वारंटाईन केले म्हणून मारहाण करण्यात आली.

वैजापूर जि. औरंगाबाद येथे आंतरजातीय प्रेम प्रकरणातून कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. नागदरा जि. बीड येथे १२ जुन रोजी होलार समाजातील बांधवांवर हल्ला या घटनान संदर्भात निवेदन वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे देण्यात आले. आत्यचार प्रवण भागात अनन्य विशेष न्यायालय स्थापन करणे, तक्रारदाराच्या मागणी नुसार विशेष सरकारी वकील नियुक्त करणे, प्रत्येक जिल्ह्यात जागरूक पोलीस निरीक्षकाची ओळख करून जातीय अत्याचाराची या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, मा. मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली दक्षता व देखरेख समितीची बैठक घेणे , सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत २ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार स्थिती अहवाल प्रकाशित करणे, अनुसूचित जाती/जमाती अधिनियम व नियमांनुसार १ अंतर्गत तातडणे मॉडेल आकस्मिकता योजना आणणे. अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहे . निवेदन देते वेळी
आयु.मोहन मेढे माजी पो.पा अमर बोदडे, युवा अध्यक्ष
आयु.रवींद्र बोदडे, राजु बोदडे, व बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.