मी शिरुडची पाण्याची टाकी बोलतेय

0

माझ्या भावना समजून घ्या.. टाकीचा अंतकरणातून निघाला आवाज..

शिरूड गावाचे प्रवेशद्वार ओलांडले की नजरेस मी पडते. मी बऱ्याच वर्षापासून या शिरूड पुण्यभूमीला सेवा देत आहे. अनमोल असे सहकार्य करत आहे. माझ्यात साठवलेले पाणी मी जनतेला पूर्वत आहे. त्या पाण्याच्या वापरामुळे बऱ्याच जनतेची तहान भागत आहे. तसेच माझे साठवून ठेवलेले पाणी गावातील सर्व नागरिकांना उपयोगात येत आहे. मात्र काही दिवसांपासूनच माझी बिकट परिस्थिती झाली आहे.

माझा जीव आता दाबायला लागला आहे. माझ्या प्रकृतीत आता बिघाड होत चालाय. माझे पाहिजे तसे वय तर अजून झाले नाही. पण शरीर मात्र साथ देत नाही ते कमकुवत होत असून कमजोरी येत चालली आहे. या शरीराला पहिल्या सारखा जोर मात्र राहिला नाही. शरीराला तारूण्य असतं नंतर वृद्धपणा देखील असतोच, पाहिजे तसा वृद्धपणा अजून मला आलेला नाही, मात्र अवयव सैल झाली असून हाडातील बळकट नाहीय.

दिवसभर मी उभी राहून या पाण्याचा भार डोक्यावर घेत मी कशी तरी उभी आहे. खाली पडणार तर नाही याची भीती खूप मात्र रोज मनात राहते. आजच्या परिस्थितीत तेवढा आभार माझ्याकडून पेलला जात नाही. बऱ्याच दिवसापासून माझ्या शरीराचे लचके आता खाली पडायला लागले आहेत. बऱ्याच वेळा माझे तुकडे खाली पडले असता त्यापासून बऱ्याचदा वेळ प्रसंगी आजूबाजूला कोणी नसल्याने बऱ्याच वेळा नागरिकांचे प्राण सुद्दा वाचले आहेत.

दिवसभर डोक्यावर ठेवलेले पाण्याचा भार पेलला जात नाही. माझे शरीर निष्क्रिय झाल्याने सहनशीलता ढासळली आहे. म्हणून शरीरातील साचलेल्या त्या पाण्याची सतत दिवसभर गळती लागली असते. असे कित्येक हजारो लिटर पाणी रोज वाया जाते. कोणाच्या आहारी लागते ना कोणाच्या कामात पडते. माझ्या शरीरातून गळत्या पाण्याचा झरे खाली पडत बाजूला असलेल्या नालीतुन जात असतो व उर्वरित पाणी गावकऱ्यांना वापरायला मिळते.

तेवढा भार माझ्याकडुन सहन होत नाही. तरीदेखील माझा वापर बळजबरीने केला जात आहे. जसा काही माझावर एकप्रकारे अत्याचार होत असल्याचं जाणवते. तेवढी ताकत राहिली नाही. केव्हाही माझा जीव जाऊन मी खाली कोसळू शकते. यामुळे कुणाची जीवित हानी होऊ नये, यासाठी मला या जागेवरून होईल तेवढे लवकर बाहेर काढा, अशी विनवणी मी करत आहे.

मी मोठ्या आशेने शिरूड ग्रामस्थांकडे पहात आहे. कारण नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने नवीन टीम आली असे म्हणतात व ते चांगले काम करतील अशा ग्रामस्थांच्या अपेक्षा आहे. यावर मी ही अपेक्षा करायला काही हरकत नाही, त्यामुळे माझं पुनरूज्जीवन होईल की मी मृत्यूमुखी पडेल यावर सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.