भुसावळात पाणी महागले ; भर पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

0

टँकरद्वारे पाणीपुरवठा

भुसावळ (प्रतिनिधी) – ऐन सणासुदीच्या तोंडावर गेल्या आठवड्या पासून शहराला पाणी पुरवठा नाही .  शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या  दुसऱ्यांदा बंद पडलेल्या 500 केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरची  दुरुस्ती अजूनही न  झाल्याने  शनिवारपर्यंत शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागन्याची परिस्थिती भर पावसाळ्यात आली असून  नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत  आहे. शहरातील जाम मोहल्ला, खडकारोड, ख्वाजा नगर, इमामवाडा आदी भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.तर काही ठिकाणी नागरिक स्वतः अधिक चार्ज देवून पाणी विकत घेत आहेत यामुळे पालिकेचे चांगलेच वाभाडे बाहेर पडत आहे .

शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण केंद्रातील 500 केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर मंगळवारी नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला.500 अश्वशक्तीचा ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यासाठी पालिकेने मंगळवारी रात्रीपासून युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले मात्र गुरुवारपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त होवू न शकल्याने पालिकेने तात्पुरता भाड्याने ट्रान्सफार्मर आणण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे  पाणीपुरवठा सभापती पिंटू ठाकूर यांनी सांगितले तसेच  आज शुक्रवारी ट्रान्सफार्मर बसवला गेल्यास उद्या  शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे . दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रावरील ट्रान्स्फॉर्मर बिघाडाची ही दहा दिवसांतील दुसरी घटना आहे तर तब्बल तीनवेळा शहरातील पाणीपुरवठा बाधीत झाल्याने पावसाळ्याच्या काळातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाला यश आले नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.